अरिहंत अकॅडमीने महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त फी न आकारता शिक्षणामध्ये पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला .
विद्यार्थ्यांचे शिक्षण शक्य तितक्या कमी अडथळ्यांसह सुरू राहावे, ही आमची सर्वात पहिली प्राथमिकता होती.
POSTED BY : ANAGHA SAKPAL DATED ON : 19/07/2026 (9004379946)
मुंबई (NHI24.COM) : अरिहंत अकॅडमी लिमिटेडने आज जाहीर केले की, ते महेश ट्युटोरियल्सच्या (एमटी एज्युकेअर लिमिटेड) पात्र विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवासात सातत्य राखण्यासाठी शैक्षणिक पाठबळ देत आहेत. अरिहंतसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोपरी आहे आणि म्हणून त्यांनी कोणतीही अतिरिक्त फी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी त्यांच्या कोर्सेससाठी केवळ उर्वरित फी भरतील.
अरिहंत अकॅडमी लागू असलेल्या प्रवेश धोरणांच्या अधीन राहून मुंबई महानगर क्षेत्रातील निवडक अरिहंत अकॅडमी शाखांमध्ये महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन योग्य कोचिंगचे पाठबळ देईल. या पाठबळाचा फायदा इयत्ता ८ वी ते १० वी, ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या जवळपास १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
अखंडित शैक्षणिक तयारीचे महत्त्व ओळखून, विशेषतः बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अरिहंत अकॅडमीच्या अभ्यासक्रम सहाय्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करणे हा आहे. सुव्यवस्थित कोचिंग, अनुभवी शिक्षक आणि प्रस्थापित शैक्षणिक चौकटीत प्रवेश देऊन अरिहंत अकॅडमी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे की, विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतील.
अरिहंत अकॅडमी लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक अनिल कपासी म्हणाले, “महेश ट्युटोरियल्ससमोरील व्यावसायिक अडचणींनंतर तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आमच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा विद्यार्थ्यांचे शिक्षण शक्य तितक्या कमी अडथळ्यांसह सुरू राहावे, ही आमची सर्वात पहिली प्राथमिकता होती. अरिहंत अकॅडमीमध्ये आमचा विश्वास आहे की, अशा परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागू नये. आमचे पूर्ण लक्ष त्यांना आश्वासक अध्ययन वातावरण, शैक्षणिक मार्गदर्शन आणि आवश्यक ते सातत्य मिळवून देण्यावर आहे, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतील.”
प्रवेश आणि विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया पुढे जाईल, तसतसे अरिहंत अकॅडमी आपल्या प्रवेश पद्धती आणि उपलब्ध क्षमतेनुसार विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुलभ करेल. विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक पाठबळ मिळावे आणि ते पूर्ण आत्मविश्वासाने आपली तयारी सुरू ठेवू शकतील,




