टेक्नोलॉजीटॉप न्यूज़महाराष्ट्र

आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, मिसिंग लिंक रोड खुला

मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 01/05/2026 📞  8850212023

मुंबई NHI24.COM(M) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. घाटातील वळणावळणाचे रस्ते टाळून थेट आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल. परिणामी, मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

देशातील पहिला द्रुतगती महामार्ग

2002 मध्ये सुरू झालेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग देशातील सर्वात पहिल्या द्रुतगती मार्गांपैकी एक मानला जातो. यामुळे पुणे जिल्ह्यात आणि परिसराती दोन दशकांपासून विकासाला चालना मिळाली आहे. या मार्गावर 1996-97मध्येच खालापूर ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) दरम्यान 13.3 किमी लांबीच्या मिसिंग लिंकचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर 2019मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं आणि अवघ्या 7 वर्षांनंतर 2026मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी झालं.

दुपारी मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं .परंतु, कार्यक्रमानंतर मंडप आणि इतर सर्व अडथळे काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणं सुरक्षित नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी आज  रात्री उशीरा किंवा मध्यरात्रीनंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तेव्हाही या मार्गावर केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांना 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत मार्गावर प्रवेशबंदी असेल.

ऑगस्ट 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम अनेक भौगोलिक अडचणींवर मात करत पूर्ण करण्यात आले आहे. सुमारे 6,695.37 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या सुमारे 180 मीटर खोलीखाली खोदण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इंधनाचाही सुमारे 20 टक्के बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे. तसेच, वाहतुकीचा ताण कमी झाल्याने अपघातांची शक्यता देखील घटणार आहे.
एकूणच, मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!