200 कोटी रुपयांचा रिटेल प्रकल्प भिवंडीचे लाइफस्टाइल डेस्टिनेशनमध्ये रूपांतर करेल
भिवंडीचे लाइफस्टाइल डेस्टिनेशनमध्ये रूपांतर

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 19/12/2025 📞 9004379946
भूमी वर्ल्डचा ‘द आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ महत्त्वाकांक्षी प्रकल्प
भिवंडी, (RMN.IN) :आगामी ‘द आउटलेट मॉल ऑफ इंडिया’च्या शुभारंभाची घोषणा करताना भूमी वर्ल्ड अत्यंत आनंदी आहे. हा एक महत्त्वाकांक्षी, सुमारे 200 कोटी रुपयांचा प्रकल्प असून, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) किरकोळ विक्री क्षेत्राचे स्वरूप तो पूर्णपणे बदलून टाकेल. हा मॉल भिवंडी येथे असेल. पूर्वापार एक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख असलेली भिवंडी आता एका समृद्ध आर्थिक पट्ट्यात रूपांतरित होत आहे. भारतातील सर्वात मोठ्या आउटलेट मॉल्समध्ये याचा समावेश होईल. या प्रकल्पाचा शुभारंभ मार्च महिन्याच्या मध्यावर होणार आहे.
वर्षभर सवलत या मॉडेलवर आधारित, ‘द आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ ग्राहकांना वर्षभर टिकतील अशी टिकाऊ उत्पादने देईल. तसेच येथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत महत्त्वाचे ब्रँड्स लक्षणीयरीत्या कमी किमतीत उपलब्ध होतील. शहरांतील पारंपरिक विक्री केंद्रांशिवाय शहराबाहेरील किरकोळ विक्री केंद्रे कशी असतात, त्याची रचना कशी केली जाते, याचा एक वेगळा दृष्टिकोन यामुळे समोर येतो. तसेच यामुळे प्रमुख महानगरांच्या सीमेवरील भागातील लोकांच्या संघटित, मूल्य-आधारित किरकोळ खरेदीसाठीच्या केंद्राच्या वाढत्या मागणीची पूर्तता होते.
खरेदीचा एक वेगळा अनुभव देण्याबरोबरच, ‘द आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ भिवंडीच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सज्ज आहे. एक नवीन रिटेल-आर्थिक कॉरिडॉर तयार करून, हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करेल. तसेच मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील ग्राहकांना आकर्षित करेल, असा अंदाज आहे.
श्री.प्रकाश पटेल, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, भूमी वर्ल्ड म्हणाले,”द आउटलेट मॉल ऑफ इंडिया हा केवळ एक प्रोजेक्ट नाही तर एका प्रमुख लाइफस्टाइल डेस्टिनेशनमध्ये भिवंडीचे रूपांतर करण्याची एक दूरदृष्टी आहे. बायसेस्टर व्हिलेज आणि वुडबरी कॉमनसारख्या आंतरराष्ट्रीय मानकांपासून प्रेरणा घेऊन, आम्ही भारतात जागतिक दर्जाचे ‘रिटेलटेनमेंट’ आणत आहोत. 365 दिवस सवलती देऊन, आम्ही नवीन युगातील ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करत आहोत, तसेच स्थानिक आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीसाठी आमच्या पायाभूत सुविधा एक मजबूत स्रोत म्हणून काम करतील याची आम्हाला खात्री आहे.”




