खेल

भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये दाखल;भारताने उपांत्य फेरीत रचले विक्रम 

भारताने उपांत्य फेरीत रचले विक्रम 

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 00/02/2026 📞  8850212023

वैभव सूर्यवंशी आणि जॉर्जच्या वादळापुढे अफगाणिस्तानची दाणादाण

भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली. 

मुंबई NHI24.COM(M): भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली. वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावा केल्या. या खेळीनंतर अफगाणिस्तानने दिलेले 311 धावांचं लक्ष्यही भारतीय संघासमोर ठेंगणं वाटू लागलं होतं. भारताने 41.1 ओव्हरमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केलं. 7 गडी राखून भारताने हा सामना जिंकत दिमाखात फायलनमध्ये प्रवेश केला आहे.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह काही विक्रमांना गवसणी घातली आहे.
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने हे लक्ष्य 41.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. अंतिम फेरीत धडक भारताने काही विक्रम रचले आहे. भारताने 311 धावांचा पाठलाग करत अंडर 19 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये 304 धावांचा पाठलाग केला होता. दरम्यान  भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम दहाव्यांदा एन्ट्री मारली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. त्यांनी सहावेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo-BCCI Twitter)

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने हे लक्ष्य 41.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. अंतिम फेरीत धडक भारताने काही विक्रम रचले आहे. भारताने 311 धावांचा पाठलाग करत अंडर 19 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये 304 धावांचा पाठलाग केला होता. दरम्यान भारताने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम दहाव्यांदा एन्ट्री मारली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. त्यांनी सहावेळा अशी कामगिरी केली आहे.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशी संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये डेवॉर्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 18 षटकार मारले होते. जॅक बर्नहॅमने 2016 मध्ये 15 षटकार मारले होते. आता वैभव सूर्यवंशीने 2026 मध्ये या विक्रमाची बरोबरी केली आहे. अंतिम सामन्यात 4 षटकार मारताच टॉपला विराजमान होईल. (Photo-BCCI Twitter)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशी संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये डेवॉर्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 18 षटकार मारले होते. जॅक बर्नहॅमने 2016 मध्ये 15 षटकार मारले होते. आता वैभव सूर्यवंशीने 2026 मध्ये या विक्रमाची बरोबरी केली आहे. अंतिम सामन्यात 4 षटकार मारताच टॉपला विराजमान होईल.

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 311 धावा गाठल्या. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी 2006 मध्ये 305 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. (Photo-BCCI Twitter)
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 311 धावा गाठल्या. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी 2006 मध्ये 305 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता.
अंडर 19 वनडे क्रिकेटमधील दोन्ही संघांच्या धावांची बेरीज करता दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात दोघांच्या मिळून 621 धावा झाल्या. हा विक्रम ऑस्ट्रेलिया आयर्लंड संघाच्या नावावर आहे. या संघांनी एकत्रित 2004 साली 631 धावा केल्या होत्या. (Photo-BCCI Twitter)
अंडर 19 वनडे क्रिकेटमधील दोन्ही संघांच्या धावांची बेरीज करता दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात दोघांच्या मिळून 621 धावा झाल्या. हा विक्रम ऑस्ट्रेलिया आयर्लंड संघाच्या नावावर आहे. या संघांनी एकत्रित 2004 साली 631 धावा केल्या होत्या.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये पहिल्या तीन विकेटसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ होती.

अंडर-19 वर्ल्डकपचा अंतिम सामना 6 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला होता.

वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. वैभवने केवळ 24 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. तथापि, वैभव त्याच्या अर्धशतकानंतर जास्त काळ टिकला नाही. त्याने 33 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 68 धावा केल्या. एरॉन जॉर्ज शेवटपर्यंत टिकला आणि 104 चेंडूत 115 धावा केल्या.

 

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने 4 गडी गमावत 310 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. उस्मान सादत आणि खालिद अहमदझाई यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. दीपेश देवेंद्रनने खालिदला (31) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर उस्मान सादत आणि फैसल शिनोजादा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या.

फैसल शिनोजादा आणि उजैरुल्लाह नियाझाई यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. शिनोजादा यांनी 93 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या. उजैरुल्लाह नियाझाईने 86 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. भारतीय संघाकडून कनिष्क चौहानने सर्वाधिक 2 विकेट बळी घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!