युवा

PKL आणि JioStar कडून भारतीय महिलांच्या कबड्डी विश्वचषक विजेत्यांचा सत्कार

भारतीय महिलांच्या कबड्डी विश्वचषक विजेत्यांचा सत्कार

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 12/12/2025 📞  9004379946

मुंबई,( NHI@24.COM) : बांगलादेशच्या ढाक्यात झालेल्या महिलांच्या कबड्डी विश्वचषकात 24 नोव्हेंबर रोजी विजय मिळवून परतलेल्या भारतीय महिला कबड्डी संघाचा शुक्रवारी प्रो कबड्डी लीग (PKL) आणि JioStar यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. भारताने अंतिम सामन्यात चिनी तैपेईचा 35–28 असा पराभव करून सलग दुसरा विश्वचषक जिंकत या क्रीडेत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

भारत संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. सर्व गट सामने जिंकल्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इराणचा 33–21 असा पराभव केला. चिनी तैपेईने देखील आपल्या गटात अपराजित राहत यजमान बांगलादेशला 25–18 ने हरवून अंतिम फेरी गाठली.

समारंभात बोलताना JioStar चे मुख्य कार्यकारी अधिकारी (स्पोर्ट्स) इशान चॅटर्जी यांनी या ऐतिहासिक वर्षात महिला क्रीडा क्षेत्रातील मोठ्या यशाबद्दल बोलले. ते म्हणाले, “भारतीय महिलांच्या कबड्डी संघाचे हे अपूर्व यश हा केवळ ट्रॉफी जिंकण्याचा विषय नाही; ते देशभरातील तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्या आता या संघाकडे पाहून म्हणू शकतात ‘त्या करू शकतात, तर मीही करू शकते.’”

PKL लीगचे अध्यक्ष आणि मशाल स्पोर्ट्सचे बिझनेस हेड, श्री. अनुपम गोस्वामी यांनी महिलांच्या कबड्डीसाठी असलेल्या दीर्घकालीन दृष्टीकोनावर भर दिला. त्यांनी सांगितले, “फेडरेशनची बांधिलकी विशेषतः 12 वर्षांनी महिला विश्वचषक परत आणणे हा क्रीडेला योग्य दिशेने नेणारा टप्पा आहे. हा विश्वचषक विजय केवळ जिंकण्यापुरता नाही; तर आपल्यासाठी एक सामाईक जबाबदारी आहे.”

ते पुढे म्हणाले, “महिला कबड्डी लीग सुरू करण्याबाबत घाई करणे योग्य नाही. आपल्याला ती योग्य पद्धतीने उभारावी लागेल अशा खेळाडूंनी जी खरोखर त्याचा भाग बनू इच्छितात, अशा मॉडेलने ज्याला व्यावसायिक अर्थ आहे आणि अशा संरचनेने जी महिलांच्या कबड्डीला दीर्घकाळ साथ देऊ शकेल.”

मुख्य प्रशिक्षक व्ही. तेजस्विनी बाई यांनी संघाच्या प्रगती आणि तयारीबद्दल सांगितले, “ही तिसरी वेळ आहे की मी अशा प्रशिक्षक गटाचा भाग आहे ज्यांनी पदक जिंकले आहे, आणि प्रत्येक वेळ विशेष आहे. मला फक्त निकालाचा अभिमान नाही, तर या संपूर्ण प्रवासाचा अभिमान आह हा विजय म्हणजे शिस्तबद्ध तयारीच्या महिन्यांचे फलित आहे.”

कर्णधार ऋतु नेगी यांनी संघाच्या एकजुटीबद्दल बोलताना सांगितले, “शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे मला जास्त खेळता आले नाही, आणि ते नक्कीच खटकलं. पण आमचा संघ कोणत्याही एका खेळाडूपेक्षा मोठा आहे. महत्त्वाचं म्हणजे आमच्या खेळाडूंनी पुढाकार घेतला आणि गरजेनुसार प्रदर्शन केले. विश्वचषक जिंकून आणि देशभरातून माननीय पंतप्रधानांसह मिळालेला सन्मान पाहून आमचे कष्ट खरंच भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याची जाणीव होते.”

जागतिक स्तरावर, AKFI चे अध्यक्ष विभोर विनीत जैन यांनी कबड्डीतील बदलांबद्दल सांगितले, “कबड्डी आता फक्त उपखंडापुरती मर्यादित राहिलेली नाही. चिनी तैपेई आणि इराणसारख्या देशांनी स्पर्धेचे स्वरूप बदलून टाकले आहे. ही विविधता क्रीडेला अधिक समृद्ध करत आहे आणि आम्ही कबड्डीला जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी सर्व पातळ्यांवर काम करत आहोत.”

या सत्कार सोहळ्यात फक्त संघाच्या उल्लेखनीय विजयाचा नव्हे, तर भारतातील महिलांच्या कबड्डीला मिळत असलेल्या वाढत्या गतीचा आणि मजबूत संस्थात्मक सहाय्याचा उत्सव साजरा करण्यात आला ज्यामुळे क्रीडाक्षेत्रात पुढील वर्षे परिवर्तनशील आणि उत्साहवर्धक ठरणार हे स्पष्ट होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!