खेल

यशस्वीचा शतकी तडाखा, रो-को अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब

भारताने सामन्यासह मालिका जिंकली

POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 06/12/2025 📞  9004379946

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकुटाने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने लोळवलं.

IND vs SA : यशस्वीचा शतकी तडाखा, रोहित-विराटचं चाबूक अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब
Yashasvi Jaiswal Maiden Odi HundredImage Credit source: Bcci x Account

 

मुंबई,( NHI@24.COM) : यशस्वी जैस्वाल याचं शतक आणि रोहित शर्मा तसेच विराट कोहली या अनुभवी जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या-अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 61 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 39.5 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. भारताने यासह ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात केली. तर रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा होता. मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवत कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड केली.

पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माचे शतक हुकले होते. रोहित ही कसर यावेळी भरून काढेल, अस वाटत होते. पण रोहित पुन्हा एकदा शतक झळकावण्यात अपयशी ठरला. रोहितने यावेळी ७३ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला, पण त्यानंतर यशस्वीने सर्व जबाबदारी यावेळी आपल्या खांद्यावर घेतली. यशस्वी जयस्वालने शतक झळकावत गेल्या दोन्ही सामन्यांतील अपयश यावेळी झाकून टाकले आणि आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.
क्विंटन डीकॉकने दमदार शतक झळकावले होते, त्यामुळे त्यांचा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. गेल्या दोन्ही सामन्यांची सरासरी ही ३५० धावांएवढी होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका यावेळी ३५० धावा करतील, असे वाटत होते. पण त्यांना यावेळी तिनशे धावाही करता आल्या नाहीत आणि त्यांच्यावर मोठी नामुष्कीची वेळ यावेळी ओढवली.

 

कुलदीप-कृष्णाचा कहर

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अर्शदीप सिंह याने रायन रिकेल्टन याला आऊट करत दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. त्यानंतर क्विंटन डी कॉक याने टेम्बा बवुमा याच्यासह दुसर्‍या विकेटसाठी शतकी तर तिसऱ्या विकेटसाठी मॅथ्यू ब्रिट्झकेसह अर्धशतकी भागीदारी केली. क्विंटन डी कॉक 106 आणि टेम्बा बवुमा याने 48 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सहज 320 पेक्षा अधिक धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र प्रसिध कृष्णा आणि कुलदीप या यादव या भारताच्या वेगवान आणि फिरकी जोडीने कमाल केली. या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचं 47.5 ओव्हरमध्ये 270 रन्सवर पॅकअप केलं. तर अर्शदीप सिंह आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!