एचडीएफसी म्युच्युअल फंड — गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून ‘जागृती यात्रा’सोबत भागीदारी
एचडीएफसी म्युच्युअल फंड — ‘जागृती यात्रा’सोबत भागीदारी
‘Posted BY:: ANAGHA, 06 NOVEMBER 2025 9004379946
आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने प्रवास — जागृती यात्रेच्या 18 व्या आवृत्तीला मुंबईतून शुभारंभ
एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती उपक्रमामार्फत मिळाला ऊर्जा पुरवठा
मुंबई,(NHI@24)भारताच्या उद्योजकतेच्या शक्तीचा उत्सव साजरा करत, जागृती यात्राच्या 18व्या आवृत्तीला आज संध्याकाळी मुंबईतील बांद्रा वेस्ट येथील बाल गंधर्व रंग मंदिरात शुभारंभ झाला आणि ध्वज फडकवण्यात आला. 15 दिवसांचा आणि 8,000 किलोमीटरचा हा राष्ट्रव्यापी प्रवास भारतातील आणि परदेशातील निवडक 500 युवकांना एकत्र आणणार आहे. देशभरातून आलेल्या 68,000 अर्जदारांमधून या यात्रेसाठी सहभागी निवडले गेले — जागृती यात्रेच्या उद्दिष्टाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचे हे ठोस उदाहरण आहे. या यात्रेचा हेतू उद्योजकतेद्वारे देशाच्या विकासाला गती देणे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यात योगदान देणे हा आहे. या वर्षीची जागृती यात्रा एचडीएफसी म्युच्युअल फंड द्वारे समर्थित आहे. त्यांच्या गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता उपक्रमामार्फत (Investor Education & Awareness Initiative) भारतातील युवकांना उद्योजकता, शिक्षण आणि आर्थिक साक्षरतेद्वारे सक्षम करण्याचे समान ध्येय प्रतिबिंबित होते.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले श्री. नवनीत मुन्होत, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, यांनी भारताच्या उद्योजकीय ऊर्जेला विकसित भारत@2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी जोडणारे प्रेरणादायी भाषण केले. ते म्हणाले:
“आत्मनिर्भरता जागरूकतेपासून सुरू होते — म्हणजेच स्वतःच्या क्षमतेची आणि उद्दिष्टाची जाणीव होणे. एचडीएफसी म्युच्युअल फंडमध्ये आम्ही विश्वास ठेवतो की खरे सबलीकरण तेव्हाच होते, जेव्हा भारतातील तरुण केवळ मोठी स्वप्ने पाहत नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतात. आमच्या गुंतवणूकदार शिक्षण उपक्रमांद्वारे आम्ही आर्थिक साक्षरता वाढवण्याचा आणि म्युच्युअल फंड या गुंतवणुकीच्या पर्यायाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो — भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आत्मविश्वासाने आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करू शकेल.
जागृती यात्रा आत्मविश्वास, स्वप्नपूर्ती आणि राष्ट्रनिर्मितीच्या या भावनेचे सुंदर प्रतीक आहे. गुंतवणूकदार सक्षमीकरण आणि विश्वास निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाशी ही यात्रा पूर्णपणे सुसंगत आहे. उद्याचे उद्योजक आणि नेते घडविणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात ऊर्जा आणि उत्साहाने झाली. विचारप्रवर्तक अनुभवकथन, प्रेरक सादरीकरणे आणि तरुणांच्या उर्मीने संपूर्ण सभागृह भारावून गेले — आणि आगामी प्रवासाचा स्वर निर्धारीत झाला. जागृती यात्राचे संस्थापक आणि देवरिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. शशांक मणी यांनी या चळवळीमागील तत्त्वज्ञान आणि ध्येय स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या जवळपास दोन दशकांपासून ही यात्रा भारतातील पुढील पिढीतील परिवर्तनकर्त्यांना घडवत आहे, त्यांच्यात उद्योजकतेची ज्योत पेटवत आहे.
श्री मणी म्हणाले: “सतरा वर्षांपासून जागृती यात्रा हा प्रवास फक्त रेल्वेचा नाही, तर उद्दिष्ट शोधण्याचा आणि उद्योजकता जागविण्याचा आहे. आज १८व्या आवृत्तीला प्रारंभ होत असताना एक गोष्ट स्पष्ट आहे — भारताचे भविष्य तेच घडवतील जे राष्ट्रनिर्मितीला स्वतःची जबाबदारी मानतात. नाविन्य, कृती आणि एकत्रित इच्छाशक्ती यांच्या जोरावर आत्मनिर्भर भारताची उभारणी होईल.”
जागृतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशुतोष कुमार यांनी यात्रेच्या वाढत्या जागतिक प्रभावावर प्रकाश टाकत, आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक विकास या राष्ट्रीय ध्येयाशी तिचे असलेले नाते स्पष्ट केले. ते म्हणाले: “दरवर्षी जागृती यात्रा आपल्या काळाचा आत्मा प्रतिबिंबित करते. आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारित १८वी आवृत्ती यात्रींना स्थानिक नाविन्य, समुदायाची ताकद आणि स्वयंनिर्भरता कशी उभी राहते हे जाणून घेण्यासाठी प्रेरित करते. ही यात्रा म्हणजे चालती–बोलती शाळा आहे. येथे उद्योग आणि उद्योजकता कशी वैयक्तिक प्रगतीसोबतच राष्ट्रपरिवर्तनाचे साधन ठरू शकते हे प्रत्यक्ष पाहायला मिळते.”
कार्यक्रमात मान देशी फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती चेतना गाला सिन्हा यांचे मुख्य भाषण देखील झाले. त्यांनी उद्योग आणि उद्योजकतेद्वारे घडणाऱ्या परिवर्तनाचे उदाहरण आपल्या जीवनप्रवासातून मांडले. ग्रामीण महिलांना उद्योजकतेसाठी सक्षम करण्याचा त्यांचा अनुभव सांगताना त्यांनी यात्रेतील युवकांना प्रेरित केले.
संध्येच्या वैभवात भर घालत, कॅम्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टी. कृष्णकुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी भारताच्या प्रगतीकथेत ग्रासरूट उद्योजकतेचा आणि कॉर्पोरेट भागीदारीचा महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला आणि नव्या उद्योगपिढीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
जागृती यात्रा सुरू झाल्यापासून ती जगातील सर्वात मोठ्या उद्योजकता प्रवासांपैकी एक बनली आहे. आजवर या यात्रेने 8 हजारांपेक्षा अधिक यात्रेकरू सहभागी झाले आहेत आणि नाविन्य व उद्योजकतेच्या बळावर मिडल इंडिया घडवण्याच्या ध्येयाने काम करणाऱ्या तरुण नेत्यांचे एक भक्कम नेटवर्क तयार केले आहे. जागृती एक्सप्रेस — कल्पना, अनुभव आणि शिकण्याचे चालते-फिरते परिसंस्थान — मुंबईहून अहमदाबाद, कोची, हुबळी आणि अन्य महत्त्वाच्या शहरांपर्यंत प्रवास करणार आहे.
हा प्रवास अशा ठिकाणी थांबेल जे समावेशक आणि टिकाऊ विकासाचे आदर्श उदाहरण आहेत. यात्रेत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि मेंटर्स सहभागी होणार आहेत — श्री. आश्विन नाईक (एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन, जागृती), श्री. समीर के. मोदी (हेड, K7 Labs), कॅप्टन शिनिश (भारतीय नौदल), श्री. विशाल ढाले (सह-संस्थापक, Rapido), सुश्री सोवाथा न्युऊ (Impact Hub) आणि श्री. कमा कृष्ण. हे सर्व जण उद्योजकता, नाविन्य आणि नेतृत्वाचे दृष्टिकोन यात्रेतील युवकांसोबत शेअर करतील. जागृती
यात्रेच्या 18व्या आवृत्तीला Tally Solutions आणि Campa यांचे उदार समर्थन मिळाले आहे, ज्यातून भारतातील पुढील पिढीतील उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते घडविण्याच्या उद्दिष्टात India Inc. च्या वाढत्या सहभागाचा प्रत्यय येतो.
आज रात्री मुंबईहून जागृती एक्सप्रेस सुटताना ती केवळ 500 यात्रेकरूंना घेऊन निघत नाही, तर ती एका राष्ट्राच्या आकांक्षाही घेऊन जाते — असे तरुण मन, जे प्रभाव निर्माण करण्यास, संधी घडवण्यास आणि आत्मनिर्भर भारताची कथा स्वतः लिहिण्यास सज्ज आहेत.
SIP (सिस्टिमॅटिक इन्क्वेस्टमेंट प्लॅन) — फायदे
- मार्केटचे टाइमिंग करण्याच्या ताणातून मुक्ती
- दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी योग्य
- शिस्तबद्ध गुंतवणूक
अधिक माहितीसाठी भेट द्या : www.hdfcfund.com/sip
An Investor Education and Awareness Initiative
Visit https://www.hdfcfund.com/information/key-know-how to know more about the process to complete a one-time Know Your Customer (KYC) requirement to invest in Mutual Funds. Investors should only deal with registered Mutual Funds, details of which can be verified on the SEBI website (www.sebi.gov.in/intermediaries.html). For any queries, complaints & grievance redressal, investors may reach out to the AMCs and / or Investor Relations Officers. Additionally, investors may also lodge complaints directly with the AMCs. If they are not satisfied with the resolutions given by AMCs, they may raise complaint through the SCORES portal on https://scores.sebi.gov.in/ SCORES portal facilitates investors to lodge complaint online with SEBI and subsequently view its status. In case the investor is not satisfied with the resolution of the complaints raised directly with the AMCs or through the SCORES portal, they may file any complaint on the Smart ODR on https://smartodr.in/login.
MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



