ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) तर्फे 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बूस्ट इंडियाज एक्सपोर्ट ऑफ प्लॅस्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट -अ ग्लोबल सोर्सिंग हब' २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत
ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) तर्फे 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स

२०२४ मध्ये १,३०० अब्ज डॉलर्सच्या जागतिक प्लास्टिक बाजारपेठेत भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स,पुढील तीन वर्षांत निर्यात चौपट वाढवण्याचे लक्ष्य,
- ५०,००० हून अधिक MSMEs, ४.६ दशलक्ष रोजगार व १२५ देशांना निर्यात -भारताची ताकद
POSTED BY ANGHA SAKPAL, SEPTEMBER 19 , 2025
मुंबई -(NHI) जागतिक प्लास्टिक व्यापारात भारत निर्णायक उडी घेण्यासाठी सज्ज आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयदृष्टीखाली, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) ने पुढील तीन वर्षांत भारतातील प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीला चौपट वाढवण्याची महत्वाकांक्षी रणनीती जाहीर केली आहे. तसेच २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेची घोषणाही करण्यात आली.
हे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत AIPMAच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्री. अरविंद मेहता यांनी जाहीर केले. श्री. अरविंद मेहता म्हणाले, “हा फक्त व्यापार विस्तार नसून, भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचा राष्ट्रीय मिशन आहे.”
श्री. मेहता यांनी सांगितले की, जागतिक प्लास्टिक फिनिश्ड वस्तूंचा व्यापार सुमारे १,३०० अब्ज डॉलर्स इतका आहे, परंतु भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच एकूण ०.९६% इतका आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत एकट्याने ७२.३५ अब्ज डॉलर्स किमतीची प्लास्टिक उत्पादने आयात केली जातात, परंतु त्यात भारताचा वाटा फक्त १.२% आहे. योग्य धोरणांमुळे २-३ नवीन पॉलिमर प्लांट्स, प्लास्टिक मशिनरी व सहयोगी युनिट्समध्ये १००% वाढ, MSME-आधारित उत्पादनात मोठी भर पडू शकते. रोजगार व कौशल्यविकासात भर पडेल. चीनच्या Canton Fair च्या उदाहरणावरून योग्य शासकीय धोरणे निर्यात कशी बदलू शकतात हे स्पष्ट होते.
भारतातील प्लास्टिक उद्योग प्रामुख्याने MSME-आधारित आहे. देशभरात ५०,००० हून अधिक युनिट्स कार्यरत असून या क्षेत्रात सुमारे ४.६ दशलक्ष लोक थेट व अप्रत्यक्षरित्या रोजगार करतात. निर्यात लक्ष्य साध्य झाले तर रोजगार संधी ६ दशलक्षांवर पोहोचू शकतात.
AIPMA चे अध्यक्ष श्री. मनोज आर. शाह यांनी म्हटले, “ही फक्त व्यापाराची गोष्ट नाही; तर लाखो MSMES ना सक्षम करणे, देशभरात रोजगार निर्माण करणे आणि भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, AIPMA च्या Export Cell ने २१ देश व ९ HSN कोड्सचा सखोल अभ्यास केला आहे. यात भारताचा प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्स निर्यात हिस्सा १.२% आहे, तर चीनचा २२% व व्हिएतनामचा ४% आहे. अभ्यासात USA, चीन, जर्मनी, मेक्सिको, फ्रान्स, इटली, यूके, कॅनडा, पोलंड, नेदरलँड्स, तुर्की, जपान, स्पेन, बेल्जियम, UAE, ब्राझिल, चिली, इथिओपिया, घाना, केनिया व नायजेरिया या देशांचा समावेश आहे.
हा अभ्यास २०२१ ते २०२३ या १५ महिन्यांच्या कालावधीत करण्यात आला. यात निष्कर्ष काढण्यात आला की भारताकडे गुणवत्ता व किमतीतील स्पर्धात्मकतेमुळे चीन व व्हिएतनामची जागा घेण्याची प्रबळ क्षमता आहे.
या मिशनला गती देण्यासाठी AIPMA ने तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत. या परिषदा AIPMA तर्फे CPMA, PMMAI व OPPI यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित असून भारत सरकारच्या रसायन व खत मंत्रालयातील रसायन व पेट्रोकेमिकल विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभाग आणि FIEO यांनी समर्थित आहेत. पहिली परिषद दिल्ली येथे १७ जुलै २०२५ रोजी, दुसरी अहमदाबाद येथे २२ ऑगस्ट २०२५ रोजी झाली असून तिसरी परिषद २४ सप्टेंबर २०२५ रोजी हॉटेल ललित, मुंबई येथे होणार आहे.
या परिषदा निर्यातदार, धोरणकर्ते, जागतिक खरेदीदार व व्यापारतज्ज्ञ यांना एका व्यासपीठावर आणून रणनीती, नेटवर्किंग व सहकार्याला चालना देतील.
याशिवाय, २०२६ मध्ये “PlastiWorld 2026 Exhibition” चे आयोजन २३ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे केले जाईल. ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी असेल जी केवळ प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्ससाठी समर्पित असेल. घरगुती वस्तूंपासून आरोग्य, वैद्यकीय, ऑटोमोटिव्ह व क्रीडा क्षेत्रातील प्लास्टिक उत्पादने जागतिक खरेदीदारांसाठी येथे सादर केली जातील.
AIPMA चे Arvind Mehta Technology & Entrepreneurship Centre (AMTEC) तरुण पिढीला प्रोटोटायपिंग, टूल डिझाइन, उत्पादन नवोन्मेष अशा क्षेत्रात प्रशिक्षण व कौशल्यविकास करून सक्षम करत आहे. FIEO च्या सहकार्याने AIPMA स्पर्धात्मक, विश्वासार्ह व नवोन्मेषावर आधारित निर्यात परिसंस्था निर्माण करत आहे.
भारतातील प्लास्टिक उद्योग आता फक्त उत्पादनापुरता मर्यादित नसून गुणवत्ता, नवोन्मेष व जागतिक विश्वासाचे प्रतीक बनत आहे. योग्य धोरणे, मजबूत शासकीय समर्थन व उद्योजक वृत्तीमुळे भारत वेगाने “प्लास्टिकचा विश्वगुरू” होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.





